sss1
previous arrow
next arrow

महाराष्ट्र साहित्य परिषद डॉ. अशोक केळकर पुरस्काराने सन्मानित २७ फेब्रुवारी २०२३

संस्थेविषयी

        महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था आहे. गेली १२० वर्षे ही संस्था मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. हा मुळीचा झरा अनेक सारस्वतांसाठी अक्षय ऊर्जाकेंद्र आहे.   

         एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात न्या. रानडे आणि लोकहितवादी यांनी ग्रंथकार संमेलने सुरू केली. चौथे ग्रंथकार संमेलन १९०६ साली प्रसिद्ध कवी गो. वा. कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात मळेकर वाड्यात भरले होते. या संमेलनाच्या समारोपात साहित्य सम्राट न.चिं.केळकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्थापनेची घोषणा केली. लोकमान्य टिळकांनी त्यांना अनुमोदन दिले. तेव्हापासून महाराष्ट्र साहित्य परिषद मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. अनेक थोर सारस्वतांनी वाङ्मयसेवकांची भूमिका पार पाडत आपल्या आयुष्यातला बहुमोल वेळ देऊन या संस्थेच्या कार्याचा विस्तार केला. आज पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे-नंदुरबार, कल्याण, डोंबिवली, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांत परिषदेचे कार्य विस्तारलेले आहे. ९० शाखा आणि २० हजार आजीव सभासद आहेत.

विश्वस्त मंडळ

कार्यकारी मंडळ

योगेश श्रीनिवास सोमण (अध्यक्ष)

डॉ. स्वाती माधव महाळंक (प्रमुख कार्यवाह)

प्रदीप गजाननराव निफाडकर (कोषाध्यक्ष)

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्यकारी मंडळ ( २०२६-२०३१ )

महाराष्ट्र साहित्य पत्रिका –नियतकालिके
महाराष्ट्र साहित्य पत्रिका

मतदार सभासदांची यादी संदर्भात सूचना

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे – निवडणूक अधिसूचना

विशेष सर्वसाधारण सभा सूचना आणि प्रस्तावित घटना दुरुस्तीचा मसुदा

टपालाने मतपत्रिका प्राप्त न झालेल्या आजीव सभासदांसाठी दुबार मतदान पद्धती

मसाप निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका

ठळक घडामोडी

बोल्ली यांचे व्यक्तिमत्त्व संतपुरुषांसारखे : सोमण

महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखा व शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्ट तर्फे गेल्या सात वर्षांपासून डॉ .लक्ष्मीनारायण बोल्ली स्मृती साहित्य पुरस्कार दिला जातो.. यावर्षीचा हा पुरस्कार हा शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील मराठी विभागाचे प्रोफेसर व मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक, साहित्यिक ,संपादक डॉ रणधीर शिंदे यांना देण्यात आला. आत्तापर्यंतच्या डॉ .लक्ष्मीनारायण बोल्ली साहित्य स्मृती पुरस्कारांमध्ये कालचा कार्यक्रम जास्त सुंदर झाला ..एक तर अशा कार्यक्रमाचा हेतू साहित्यिकाचा सन्मान हा तर असतोच, परंतु ज्यांच्या नावाने हा पुरस्कार आहे .त्यांच्या स्मृतींचा जागरही महत्त्वाचा असतो. या कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे येथील नवनिर्वाचित अध्यक्ष श्री योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ .स्वाती महाळंग व कोषाध्यक्ष श्री प्रदीप निफाडकर यांचाही सन्मान केला. कालच्या कार्यक्रमात डॉ बोल्ली यांच्या स्मृतीचा जागर खूप विशेषत्वाने श्री , योगेशजी सोमण सरांनी केला.. याचा मनापासून आनंद वाटला.. म्हणजे हा पुरस्कार ठेवण्याचा जो हेतू आहे. तो कालच्या कार्यक्रमात पूर्णपणे साध्य झाला. असे मला वाटते.. सगळ्यांची भाषणे समयोचित, वेळेत आणि व्यवस्थित झाली. डॉ.ममताने अतिशय सुंदर सूत्रसंचालन केले. मानपत्र वाचत असताना सुद्धा शोभाताईंचे प्रेम आणि आपुलकी दिसून आली. श्री. निफाडकर आणि डॉ.स्वाती यांनी सुद्धा खूप छान थोड्या वेळात सर्व गोष्टींचा उल्लेख केला आणि डॉ.रणजीत शिंदे यांनी सोलापूरच्या साहित्यिकांचा सन्मान करत साहित्याविषयी अभ्यासपूर्ण भाष्य केले. बोल्ली सरांविषयी आदर व्यक्त केला.. त्यांचे भाषण त्यांचा व्यासंग स्पष्ट करत होते. हे खूप महत्त्वाचे आहे.. अध्यक्षीय समारोप मी केला. किशोरजी चंडक यांनी भेटवस्तू दिल्यामुळे कार्यक्रम व्यवस्थित झाला आणि श्री दत्ता अण्णांनी पेन आणि गळ्यात मोत्यांच्या माळा दिल्यामुळे तो सन्मान सार्थ झाला.. याच कार्यक्रमात सोलापूर जिल्हा प्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल श्री पद्माकर कुलकर्णी श्री कल्याण शिंदे व डॉ श्रुती वडगबाळकर यांचाही सत्कार करण्यात आला.. एकंदरीत सगळ्यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम देखणा झाला. स्टेजवरचे बॅनरही फारच सुंदर होते. डॉ .नरेंद्र काटीकर, भीमगोंडा पाटील, वंदना कुलकर्णी, डॉ .देविदास गुरव, श्री. गोविंद काळे, डॉ . अर्जुन व्हटकर सर्वांनीच खूप छान सहकार्य केले.. ॲड . जे जे कुलकर्णी, श्री बदीऊज्जमा बिराजदार , फैयाज शेख, डॉ . सुवर्णा गुंड यांची उणीव मात्र भासली.. या कार्यक्रमाला सोलापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व साहित्यिक उपस्थित होते. त्यामुळे आनंद द्विगुणीत झाला. कार्यक्रमाचे स्वागत श्री किशोरजी चंडक प्रास्ताविक डॉ .नरेंद्र काटीकर व आभार प्रदर्शन सौ वंदना कुलकर्णी यांनी केले.

गौरव मराठीचा

Scroll to Top