




महाराष्ट्र साहित्य परिषद डॉ. अशोक केळकर पुरस्काराने सन्मानित २७ फेब्रुवारी २०२३
संस्थेविषयी
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था आहे. गेली १२० वर्षे ही संस्था मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. हा मुळीचा झरा अनेक सारस्वतांसाठी अक्षय ऊर्जाकेंद्र आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात न्या. रानडे आणि लोकहितवादी यांनी ग्रंथकार संमेलने सुरू केली. चौथे ग्रंथकार संमेलन १९०६ साली प्रसिद्ध कवी गो. वा. कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात मळेकर वाड्यात भरले होते. या संमेलनाच्या समारोपात साहित्य सम्राट न.चिं.केळकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्थापनेची घोषणा केली. लोकमान्य टिळकांनी त्यांना अनुमोदन दिले. तेव्हापासून महाराष्ट्र साहित्य परिषद मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. अनेक थोर सारस्वतांनी वाङ्मयसेवकांची भूमिका पार पाडत आपल्या आयुष्यातला बहुमोल वेळ देऊन या संस्थेच्या कार्याचा विस्तार केला. आज पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे-नंदुरबार, कल्याण, डोंबिवली, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांत परिषदेचे कार्य विस्तारलेले आहे. ९० शाखा आणि २० हजार आजीव सभासद आहेत.
विश्वस्त मंडळ
कार्यकारी मंडळ
योगेश श्रीनिवास सोमण (अध्यक्ष)
डॉ. स्वाती माधव महाळंक (प्रमुख कार्यवाह)
प्रदीप गजाननराव निफाडकर (कोषाध्यक्ष)
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्यकारी मंडळ ( २०२६-२०३१ )
मतदार सभासदांची यादी संदर्भात सूचना
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे – निवडणूक अधिसूचना
टपालाने मतपत्रिका प्राप्त न झालेल्या आजीव सभासदांसाठी दुबार मतदान पद्धती
मसाप निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका
ठळक घडामोडी
महाराष्ट्र साहित्य पत्रिका छापील स्वरूपात प्रकाशितपुणे : सहा वर्षांच्या खंडानंतर महाराष्ट्र साहित्य पत्रिका आज (दि. ९) छापील स्वरूपात प्रकाशित करण्यात आली. जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून २०२६ असा हा जोडअंक आहे.महाराष्ट्र साहित्य परिषदेत सत्तांतर झाल्यानंतर महाराष्ट्र साहित्य पत्रिका छापील स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. ती आज प्रत्यक्षात आली आहे. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचा औपचारिक प्रकाशन सोहळा महाराष्ट्र साहित्य परिषदेत झाला. प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, कार्यवाह सुनील महाजन, प्रसाद मिरासदार, डॉ. आशुतोष जावडेकर आणि पत्रिकेचे संपादक माधव राजगुरू यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.२०२० पासून महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे प्रकाशन खंडित झाले होते. जानेवारी ते जून या कालावधीतील जोड अंक आज प्रकाशित करण्यात आला. वाचक आणि आजीव सभासदांना भविष्यात हा अंक सशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे योगेश सोमण यांनी सांगितले.१९व्या शतकात अनेक नियतकालिके सुरू झाली. मात्र मोजकीच नियतकालिके काळाच्या कसोटीवर टिकली. अशा मोजक्या नियतकालिकांपैकी महाराष्ट्र साहित्य पत्रिका ही एक आहे. भविष्यात ई-मेलवर पीडीएफ आणि छापील स्वरूपात ही पत्रिका सशुल्क उपलब्ध करून देण्याचा मसापचा विचार आहे, असे माधव राजगुरू यांनी सांगितले.महाराष्ट्र साहित्य परिषदेत कार्यालयीन वेळेत महाराष्ट्र साहित्य पत्रिका वाचकांना सशुल्क उपलब्ध आहे. फोटो ओळ : महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थित (डावीकडून) प्रसाद मिरासदार, प्रदीप निफाडकर, योगेश सोमण, माधव राजगुरू, डॉ. स्वाती महाळंक, सुनील महाजन, डॉ. आशुतोष जावडेकर.प्रति,मा. संपादक सहा वर्षांच्या खंडानंतर महाराष्ट्र साहित्य पत्रिका आज (दि. ९) छापील स्वरूपात प्रकाशित करण्यात आली.
गौरव मराठीचा

























