sss1
previous arrow
next arrow

महाराष्ट्र साहित्य परिषद डॉ. अशोक केळकर पुरस्काराने सन्मानित २७ फेब्रुवारी २०२३

संस्थेविषयी

        महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था आहे. गेली १२० वर्षे ही संस्था मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. हा मुळीचा झरा अनेक सारस्वतांसाठी अक्षय ऊर्जाकेंद्र आहे.   

         एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात न्या. रानडे आणि लोकहितवादी यांनी ग्रंथकार संमेलने सुरू केली. चौथे ग्रंथकार संमेलन १९०६ साली प्रसिद्ध कवी गो. वा. कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात मळेकर वाड्यात भरले होते. या संमेलनाच्या समारोपात साहित्य सम्राट न.चिं.केळकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्थापनेची घोषणा केली. लोकमान्य टिळकांनी त्यांना अनुमोदन दिले. तेव्हापासून महाराष्ट्र साहित्य परिषद मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. अनेक थोर सारस्वतांनी वाङ्मयसेवकांची भूमिका पार पाडत आपल्या आयुष्यातला बहुमोल वेळ देऊन या संस्थेच्या कार्याचा विस्तार केला. आज पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे-नंदुरबार, कल्याण, डोंबिवली, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांत परिषदेचे कार्य विस्तारलेले आहे. ९० शाखा आणि २० हजार आजीव सभासद आहेत.

विश्वस्त मंडळ

कार्यकारी मंडळ

योगेश श्रीनिवास सोमण (अध्यक्ष)

डॉ. स्वाती माधव महाळंक (प्रमुख कार्यवाह)

प्रदीप गजाननराव निफाडकर (कोषाध्यक्ष)

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्यकारी मंडळ ( २०२६-२०३१ )

महाराष्ट्र साहित्य पत्रिका –नियतकालिके
महाराष्ट्र साहित्य पत्रिका

मतदार सभासदांची यादी संदर्भात सूचना

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे – निवडणूक अधिसूचना

विशेष सर्वसाधारण सभा सूचना आणि प्रस्तावित घटना दुरुस्तीचा मसुदा

टपालाने मतपत्रिका प्राप्त न झालेल्या आजीव सभासदांसाठी दुबार मतदान पद्धती

मसाप निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका

ठळक घडामोडी

महाराष्ट्र साहित्य पत्रिका छापील स्वरूपात प्रकाशित पुणे

सहा वर्षांच्या खंडानंतर महाराष्ट्र साहित्य पत्रिका आज (दि. ९) छापील स्वरूपात प्रकाशित करण्यात आली. जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून २०२६ असा हा जोडअंक आहे.महाराष्ट्र साहित्य परिषदेत सत्तांतर झाल्यानंतर महाराष्ट्र साहित्य पत्रिका छापील स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. ती आज प्रत्यक्षात आली आहे. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचा औपचारिक प्रकाशन सोहळा महाराष्ट्र साहित्य परिषदेत झाला. प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, कार्यवाह सुनील महाजन, प्रसाद मिरासदार, डॉ. आशुतोष जावडेकर आणि पत्रिकेचे संपादक माधव राजगुरू यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.२०२० पासून महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे प्रकाशन खंडित झाले होते. जानेवारी ते जून या कालावधीतील जोड अंक आज प्रकाशित करण्यात आला. वाचक आणि आजीव सभासदांना भविष्यात हा अंक सशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे योगेश सोमण यांनी सांगितले.१९व्या शतकात अनेक नियतकालिके सुरू झाली. मात्र मोजकीच नियतकालिके काळाच्या कसोटीवर टिकली. अशा मोजक्या नियतकालिकांपैकी महाराष्ट्र साहित्य पत्रिका ही एक आहे. भविष्यात ई-मेलवर पीडीएफ आणि छापील स्वरूपात ही पत्रिका सशुल्क उपलब्ध करून देण्याचा मसापचा विचार आहे, असे माधव राजगुरू यांनी सांगितले.महाराष्ट्र साहित्य परिषदेत कार्यालयीन वेळेत महाराष्ट्र साहित्य पत्रिका वाचकांना सशुल्क उपलब्ध आहे. फोटो ओळ : महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थित (डावीकडून) प्रसाद मिरासदार, प्रदीप निफाडकर, योगेश सोमण, माधव राजगुरू, डॉ. स्वाती महाळंक, सुनील महाजन, डॉ. आशुतोष जावडेकर.प्रति,मा. संपादक सहा वर्षांच्या खंडानंतर महाराष्ट्र साहित्य पत्रिका आज (दि. ९) छापील स्वरूपात प्रकाशित करण्यात आली.

भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा पाया संतांनी घातला; वारी म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता : डॉ. सदानंद मोरे

भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा पाया संतांनी घातला; वारी म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता : डॉ. सदानंद मोरे सक्षम महिला, समृद्ध साहित्य दिंडी'चा प्रारंभ; पंढरीची वारी, पुस्तके आपल्या दारी' या उपक्रमाची सुरुवात पुणे : वारी ही केवळ महाराष्ट्राची ओळख नाही, तर ती आपल्या संस्कृतीची आणि अस्मितेची जिवंत परंपरा आहे. मराठी भाषा, साहित्य आणि समाजमन घडविण्याचे ऐतिहासिक कार्य संतांनी केले. ज्ञानेश्वरी, गाथेसह संत साहित्यावरच मराठी साहित्याचा भक्कम पाया उभा आहे,असे मत संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, राष्ट्रीय पुस्तक न्यास ( एनबीटी), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि समर्थ युवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी, पुस्तक वारी' या उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय 'सक्षम महिला, समृद्ध साहित्य दिंडी'चा प्रारंभ उत्साहात झाला. उद्घाटनानंतर विठ्ठलनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि भगव्या पताका फडकवत ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली.यावेळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, बागेश्री मंठाळकर, डी. बी. पवार, डॉ. नितीन घोरपडे, संदीप पालवे, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. गणेश भामे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. चारुशीला गायके, विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालक डॉ. सविता कुलकर्णी आदी उपस्थित होते.डॉ. मोरे म्हणाले, " पुणे विद्यापीठात २००४ पासून हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. वारी ही महाराष्ट्राची ओळख आणि अस्मिता आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकोबाराय, संत नामदेव, संत चोखामेळा यांच्यासह वारकरी संप्रदायातील संतांनी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती समृद्ध केली. परकीय आक्रमणांच्या काळात समाजाला आधार देण्याचे काम संतांनी आणि त्यांच्या साहित्याने केले. साहित्य आणि संस्कृती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने अविरतपणे केले आहे. वारकरी संप्रदाय आणि विद्यापीठाच्यामार्फत ही परंपरा पुढेही सुरू राहील.''सोमण म्हणाले, "वारी ही सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक चळवळ आहे. 'पंढरीची वारी, पुस्तके आपल्या दारी' या उपक्रमातून मुक्कामाच्या प्रत्येक ठिकाणी पुस्तक प्रदर्शन भरविण्यात येणार असून, १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रणही वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे."डॉ. काळकर यांनी विद्यार्थ्यांना वारीकडे 'जीवनाची इंटर्नशिप' म्हणून पाहण्याचे आवाहन केले. वारीतून समाज, संस्कृती, माणुसकी आणि सहजीवनाचे धडे मिळतात. वारकऱ्यांच्या सेवेतून संवेदनशीलता विकसित करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते, असे ते म्हणाले.उद्घाटनानंतर 'विठ्ठल... विठ्ठल', 'ज्ञानोबा-तुकोबा', 'ज्ञानोबा माऊली-तुकाराम' या जयघोषांनी विद्यापीठ परिसर दुमदुमून गेला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी, प्राध्यापक, कार्यक्रम अधिकारी यांनी एकत्रित स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, वाचन संस्कृती आणि महिला सक्षमीकरणावर आधारित पथनाट्य सादर केले. हातात जनजागृतीपर फलक घेऊन विद्यार्थ्यांनी वाचनाचा संदेश दिला. त्यानंतर दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली..... 'पंढरीची वारी, पुस्तके आपल्या दारी'चा अनोखा उपक्रम.....राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी) आणि पुणे पुस्तक महोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने 'पंढरीची वारी, पुस्तके आपल्या दारी' या उपक्रमाचा शुभारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.या उपक्रमांतर्गत एनबीटीचे फिरते ग्रंथालय (बुक बस) संपूर्ण वारीसोबत पंढरपूरपर्यंत प्रवास करणार आहे. मुक्कामाच्या प्रत्येक ठिकाणी या बसमधून पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून, वारकरी आणि नागरिकांना दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होण्याचे निमंत्रणही या माध्यमातून दिले जाणार आहे. वाचन संस्कृतीचा प्रसार आणि संत साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा हा अभिनव प्रयत्न आहे.....प्रतिक्रिया...." पंढरपूरला दरवर्षी जाणारी वारी ही अध्यात्माची आणि समाजप्रबोधनाची परंपरा आहे. एनबीटीच्या 'पंढरीची वारी, पुस्तके आपल्या दारी' या उपक्रमातून वाचनाची चळवळ वारकऱ्यांपर्यंत पोहोचेल. या साहित्य वारीतून संत साहित्याचा वारसा आणि आधुनिक ज्ञान यांची सांगड घालून अधिकाधिक नागरिकांना १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि पुणे पुस्तक महोत्सवाशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे."

गौरव मराठीचा

Scroll to Top