




महाराष्ट्र साहित्य परिषद डॉ. अशोक केळकर पुरस्काराने सन्मानित २७ फेब्रुवारी २०२३
संस्थेविषयी
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था आहे. गेली १२० वर्षे ही संस्था मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. हा मुळीचा झरा अनेक सारस्वतांसाठी अक्षय ऊर्जाकेंद्र आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात न्या. रानडे आणि लोकहितवादी यांनी ग्रंथकार संमेलने सुरू केली. चौथे ग्रंथकार संमेलन १९०६ साली प्रसिद्ध कवी गो. वा. कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात मळेकर वाड्यात भरले होते. या संमेलनाच्या समारोपात साहित्य सम्राट न.चिं.केळकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्थापनेची घोषणा केली. लोकमान्य टिळकांनी त्यांना अनुमोदन दिले. तेव्हापासून महाराष्ट्र साहित्य परिषद मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. अनेक थोर सारस्वतांनी वाङ्मयसेवकांची भूमिका पार पाडत आपल्या आयुष्यातला बहुमोल वेळ देऊन या संस्थेच्या कार्याचा विस्तार केला. आज पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे-नंदुरबार, कल्याण, डोंबिवली, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांत परिषदेचे कार्य विस्तारलेले आहे. ९० शाखा आणि २० हजार आजीव सभासद आहेत.
विश्वस्त मंडळ
कार्यकारी मंडळ
योगेश श्रीनिवास सोमण (अध्यक्ष)
डॉ. स्वाती माधव महाळंक (प्रमुख कार्यवाह)
प्रदीप गजाननराव निफाडकर (कोषाध्यक्ष)
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्यकारी मंडळ ( २०२६-२०३१ )
मतदार सभासदांची यादी संदर्भात सूचना
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे – निवडणूक अधिसूचना
टपालाने मतपत्रिका प्राप्त न झालेल्या आजीव सभासदांसाठी दुबार मतदान पद्धती
मसाप निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका
ठळक घडामोडी
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि पुण्यभूषण फाउंडेशन आयोजित सर्वोत्तम मराठी दिवाळी अंक २०२५ स्पर्धेचा निकाल जाहीर
पुणे – महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि पुण्यभूषण फाउंडेशन तर्फे दरवर्षी मराठीतील सर्वोत्तम दिवाळी अंकांना गौरवण्यात येते. या पुरस्काराचे स्वरूप सर्वोत्तम अंकाला रू.५१,००० तर उत्कृष्ट बालकुमार दिवाळी अंक, उत्कृष्ट एकाच विषयाला वाहिलेला अंक आणि उत्कृष्ट दिवाळी अंक (इतर) या तीन विभागात प्रत्येकी १५,०००/- प्रमाणे देण्यात येते.
मराठी साहित्य विश्वात मानाच्या समजल्या जाणा-या सर्वोत्तम मराठी दिवाळी अंक स्पर्धेचा २०२५ चा निकाल आता जाहीर झाला असून पुण्यभूषण सर्वोत्तम दिवाळी अंक म्हणून पद्मगंधा या दिवाळी अंकाची निवड झाली आहे. अभिषेक जाखडे या अंकाचे संपादक आहेत. रोख रू.५१ हजार व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे अशी माहिती पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी दिली.
याचप्रमाणे पुण्यभूषण उत्कृष्ट बालकुमार दिवाळी अंक म्हणून मनशक्ती बालकुमार दिवाळी अंकाची निवड करण्यात आली असून या दिवाळी अंकाच्या संपादिका वर्षा तोडमल आहेत. एकाच विषयाला वाहिलेला उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून नामदेव कोळी संपादित वाघूर या जळगाव येथून प्रकाशित होणा-या आणि लग्न या एकाच विषयाला वाहिलेल्या विशेषांकाची निवड करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे उत्कृष्ट दिवाळी अंक (इतर) या विभागात अमोल मद्वाण्णा यांचे प्रकाशन व संपादन आणि अरूण नाईक यांचे अतिथी संपादन असणारा चौफेर समाचार या सांगली येथून प्रकाशित होणा-या दिवाळी अंकाचा समावेश आहे. सांगली सारख्या ग्रामीण भागातून प्रकाशित होणा-या या अंकाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या तीनही उत्कृष्ट दिवाळी अंकांना रोख प्रत्येकी रू.१५,०००/- व प्रशस्तीपत्र दिले जाईल अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रसाद मिरासदार यांनी दिली. महाराष्ट्र साहित्य परिषद व पुण्यभूषण फाउंडेशन सर्वोत्तम मराठी दिवाळी अंक स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून संजय भास्कर जोशी, ल.म.कडू, यमाजी मालकर आणि रवीप्रकाश कुलकर्णी यांनी काम पाहिले.
पुण्यभूषण सर्वोत्तम दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण सुप्रसिध्द साहित्यिक, नाटककार आणि अभिनेते अभिराम भडकमकर यांच्या हस्ते होणार असून हा समारंभ मंगळवार दिनांक ५ मे रोजी सायं. ६ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण तसेच पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई उपस्थित राहणार आहेत.
गौरव मराठीचा