sss1
previous arrow
next arrow

महाराष्ट्र साहित्य परिषद डॉ. अशोक केळकर पुरस्काराने सन्मानित २७ फेब्रुवारी २०२३

संस्थेविषयी

        महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था आहे. गेली १२० वर्षे ही संस्था मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. हा मुळीचा झरा अनेक सारस्वतांसाठी अक्षय ऊर्जाकेंद्र आहे.   

         एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात न्या. रानडे आणि लोकहितवादी यांनी ग्रंथकार संमेलने सुरू केली. चौथे ग्रंथकार संमेलन १९०६ साली प्रसिद्ध कवी गो. वा. कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात मळेकर वाड्यात भरले होते. या संमेलनाच्या समारोपात साहित्य सम्राट न.चिं.केळकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्थापनेची घोषणा केली. लोकमान्य टिळकांनी त्यांना अनुमोदन दिले. तेव्हापासून महाराष्ट्र साहित्य परिषद मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. अनेक थोर सारस्वतांनी वाङ्मयसेवकांची भूमिका पार पाडत आपल्या आयुष्यातला बहुमोल वेळ देऊन या संस्थेच्या कार्याचा विस्तार केला. आज पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे-नंदुरबार, कल्याण, डोंबिवली, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांत परिषदेचे कार्य विस्तारलेले आहे. ९० शाखा आणि २० हजार आजीव सभासद आहेत.

विश्वस्त मंडळ

कार्यकारी मंडळ

योगेश श्रीनिवास सोमण (अध्यक्ष)

डॉ. स्वाती माधव महाळंक (प्रमुख कार्यवाह)

प्रदीप गजाननराव निफाडकर (कोषाध्यक्ष)

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्यकारी मंडळ ( २०२६-२०३१ )

महाराष्ट्र साहित्य पत्रिका –नियतकालिके
महाराष्ट्र साहित्य पत्रिका

मतदार सभासदांची यादी संदर्भात सूचना

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे – निवडणूक अधिसूचना

विशेष सर्वसाधारण सभा सूचना आणि प्रस्तावित घटना दुरुस्तीचा मसुदा

टपालाने मतपत्रिका प्राप्त न झालेल्या आजीव सभासदांसाठी दुबार मतदान पद्धती

मसाप निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका

ठळक घडामोडी

महाराष्ट्र साहित्य परिषद चे कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड. केदार सोमण यांची निवड

मराठी समाजाचे वैचारिक भरणपोषण दिवाळी अंकांमुळे ! - अभिराम भडकमकर

पुणे : आपल्या मराठी समाजातील वैचारिक परिपक्वतेचे भरण पोषण दिवाळी अंकांनी केले. यासाठी संपादकांनी केलेले काम मोठे आहे. पण आता मोजकेच दिवाळी अंक वैचारिकतेला प्राधान्य देतात हे प्रमाण वाढले पाहिजे असे विचार प्रसिद्ध साहित्यिक,  नाटककार आणि अभिनेते अभिराम भडकमकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुण्यभूषण फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ भडकमकर यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. दिवाळी अंक फक्त उपक्रम न रहाता वाचक चळवळ व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 
मसाप तर्फे देण्यात येणारा पुण्यभूषण सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार अभिषेक जाखडे आणि संतोष शेणई संपादित पद्मगंधा दिवाळी अंकाला देण्यात आला. यावेळी अध्यक्ष म्हणून बोलताना मसाप चे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी सांगितले की, दिवाळी अंकांच्या सर्व संपादक व प्रकाशकांचे चर्चासत्र घेऊन दिवाळी अंकांसमोरील सर्व समस्यांचा विचार केला पाहिजे. यासाठी मसाप पुढाकार घेईल.
 
अन्य पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालकुमारांसाठी असणा-या दिवाळी अंकाचे पारितोषिक वर्षा तोडमल संपादित मनशक्ती बालकुमार दिवाळी अंकाला देण्यात आला.  एकाच विषयावर काढलेल्या विशेषांकांचे पारितोषिक लग्न या विषयावर नामदेव कोळी यांनी संपादित केलेल्या वाघूर या दिवाळी अंकाला देण्यात आला. तसेच अन्य दिवाळी अंकातील सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून सांगलीतून प्रकाशित होणा-या चौफेर समाचार ला पारितोषिक देण्यात आले. हा अंक अमोल मद्वाण्णा आणि अरूण नाईक यांनी संपादित केला आहे. यावेळी  महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह डाॅ. स्वाती महाळंक यांनी प्रास्ताविक केले.
 
डाॅ. सतीश देसाई यांनी पुण्यभूषण फाउंडेशन च्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी परिक्षक यमाजी मालकर,  ल.म.कडू व रविप्रकाश कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.परिक्षक म्हणून रविप्रकाश कुलकर्णी यांनी विचार मांडले. मसापचे कार्यवाह प्रसाद मिरासदार सूत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन केले.
 

गौरव मराठीचा

Scroll to Top